कालच्या ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेल्या मित्र-मैत्रिणींचे आभार! खरं म्हणजे दोन-तीनदा भेटल्यानंतर जवळपास सर्वांचेच जीवनानुभव ऐकून झाल्यानंतर आता बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी काय उरलंय? असं वाटत होतं. पण तसं नसतं! एकदा भेटल्यानंतर दोन-तीन तास कसे निघून जातात कळतच नाही. सांगणं ऐकणं अपूर्णच रहातं. कदाचित हीच मैत्रीची जादू असावी.
कालची भेट गुगल मीटवर करण्याचं ठरलं होतं. पण गुगल मीट वर काही तांत्रिक अडचणी येत होत्या, म्हणजे फक्त १७ जणांना मिटिंग रूममधे प्रवेश दिला जात होता. बाकिचे दरवाजाबाहेर. बरं त्यातील कोण आत आला तर आतला एक खिडकीबाहेर. त्यात अधूनमधून गुगल-मीट राजश्री मॅडमचा माईक बंद करत होते.(मला वाटतं कोणीतरी खोडसाळपणा करत असावं 😉) थोडक्यात गुगल-मीट अळणी होतं. त्यामुळे प्राचार्या वर्षा यांनी तातडीने झूम मिटिंगची व्यवस्था केली. 👍
मजामस्ती करतच मिटिंगला सुरूवात झाली. बरेचजण एकमेकांनां दीर्घ कालावधीनंतर भेटत होते. त्यामुळे तो किंवा ती सध्या काय करते... हे जाणून घेण्याचा कार्यक्रम असणे स्वाभाविक होतं. संतोष एम.ने शाळेनंतर झालेल्या त्याच्या रेल्वेप्रवासाची माहिती दिली. म्हणजे तुम्हां-आम्हांसारखा तिकीट काढून केलेला प्रवास नाही, तो भारतीय-रेल सेवेत कार्यरत आहे. (म्हणजे कायम विदाऊट तिकीट प्रवास! 🚂)
अभयने त्याचा आतापर्यंतचा प्रवास कथन केला. अभय पूर्वी बीपीटी कॉलनीचा रहिवाशी असल्याने व ग्रुपमध्ये बरेचसे बीपीटीकर असल्याने (व काही मुलूंडकर) विषय गंमतीमध्ये थोडा प्रादेशिक अस्मितेकडे सरकला. पण मूळचे सगळे शिवाजीयन्स असल्याचे सत्य नाकारता येत नाही. आम्ही काळाचौकीकर तसे शांत(?) असतो. पण विषय काळाचौकीवर आला की नेत्रा एवढी आक्रमक होते की नेत्राभाई म्हणायला हरकत नाही 😊. तिच्यामुळे आम्ही काळाचौकीवर अगदी सुरक्षित असतो.
शैकाने त्याच्या आयुष्यातील मार्गक्रमणाची फारच मनोरंजक व आशादायक कहाणी सर्वांसोबत शेअर केली. माझे आयुष्य शिक्षण - नोकरी - कौटुंबिक जबाबदारी असं चाकोरीबद्ध असल्याने, ज्या मित्रांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांच मला नेहमीच अप्रूप वाटतं.
सुरेशदादांना स्वपरिचयाची संधी देण्यात आली परंतु सध्या दादांचा दौरा ग्रामीण भागात असल्याने व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही. स्क्रिनवर सुरेशदादा दिसत होते पण त्यांचा आवाज काही आमच्यापर्यंत पोहचत नव्हता. हावभावांवरून तर ते काहीतरी करणी करत असावेत असा भास होत होता. 😂 त्यामुळे त्यांना पुढच्या वेळी स्वपरिचयाची संधी देण्यात येईल.
विविध विषयांवर मित्र-मैत्रिणींकडे असलेल्या ज्ञानभांडाराचं कौतुक वाटतं. जगड्व्याळ शब्द न वापरता रवीदत्तने त्याच्या आयुष्यातील काही कटू अनुभव सांगितले व त्यापासून सावध रहाण्याचे उपायही सांगितले. बरेचसे मित्र दोन तास एकही शब्द न बोलता फक्त ऐकत होते. म्हणजे तुम्हाला कल्पना आली असेल, ऐकण्यासाठी व आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी किती इंटरेस्टिंग विषय होते. मध्येच गीता मॅडम आम्हाला सोशल वर्कचा गृहपाठ देऊन स्वत: गायब झाल्या. असो!
अजूनही बरंच काही होतं मिटिंगमध्ये पण आता आवरतं घेतो. अरे हां! पुणेकर आज शांतच होते. त्यांना मिटिंग संपता संपता प्रसादने शहाणपणाचा टोला लगावून जागे केले. 😘
विनायक5 years ago
संजय डी.5 years ago
विलास पी.5 years ago
राजश्री5 years ago
गणेश5 years ago
प्रदीप5 years ago
विनय5 years ago
वैशाली5 years ago
अभिजित5 years ago
रविदत्त5 years ago
गीता5 years ago
नेत्रा5 years ago
प्रसाद5 years ago
सुनील5 years ago
दीपक5 years ago
नीना5 years ago
वर्षा एस.5 years ago
वर्षा डब्ल्यू.5 years ago
समीर5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा